वीर राणोजी घोरपडे

वीर राणोजी घोरपडे
 
संताजी पुत्र राणोजी घोरपडे.
मुघल पन्हाळ्याला थोडीथोडकी नव्हे तर
तब्बल ९ वर्षे वेढा घालून बसले होते पण किल्ला आणि किल्लेदार त्यांना काही दाद देत नव्हते. औरंगजेबाने
आपले एकाहून एक सरस उमराव पन्हाळ्यावर रवाना केले होते पण या पैकी कुणीच पन्हाळा काबीज करू शकले नाहीत. किल्ल्यातून मराठे अनेक वेळेला मुघली छावणीवर रात्री-अपरात्री
गनिमी हल्ला करीत आणि जमेल तेवढे शत्रूचे नुकसान करून पुन्हा गडावर पसार होत असत.  गडावरच्या मराठयांना बाहेरून सुद्धा मदत मिळत असे. धनाजी जाधवांच्या आणि हिंदुराव
घोरपडेंच्या सैन्याने सुद्धा पन्हाळ्याच्या आसमंतातील
मुघली फौजेला हैराण करून सोडले होते. पन्हाळ्याच्या आसमंतात अतुलनीय पराक्रम करणारा अजून एक वीर म्हणजे संताजी पुत्र राणोजी घोरपडे.  या युद्धात राणोजी घोरपडेनवर
जबाबदारी होती ती मुघली रसद मारण्याची आणि त्यांनी ती चोख बजावली.  राणोजी घोरपडे शिपाईगिरित आपल्या वडलांच्या पुढेच होते असे काही इतिहासकार लिहितात. 
१७०२ च्या सुमारास
मुघली फौजेशी सामना करताना राणोजी घोरपडे
धारातीर्थी पडले. ताराराणीने राणोजी घोरपडेंच्या विधवा पत्नीला नंतर राणोजीच्या पराक्रमाची याद ठेवून कापशी सुभा इनाम म्हणून दिला.

Comments

Popular posts from this blog

हिरोजी इंदलकर

तानाजी का तान्हाजी मालुसरे? योग्य माहिती आणि संदर्भ मिळेल का?

सुभेदार थोरले मल्हारराव होळकर