तानाजी का तान्हाजी मालुसरे? योग्य माहिती आणि संदर्भ मिळेल का?
छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह ; तानाजी मालुसरे
छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरच्या तहात म्हणजेच मिर्जाराजे जयसिंगासोबत झालेल्या तहात जेवढे किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यापैकी एक होता, किल्ले कोंढाणा. माँसाहेब जिजाऊंना सर्वात प्रिय असणारा हा गड होता. मिर्जाराजे जयसिंगा बरोबर झालेल्या तहामुळे हा किल्ला माँसाहेबांना सोडून यावा लागला. या तहात ठरल्यानुसार आणि मिर्जा राजे जयसिंग यांच्या खास आग्रहा खातर छत्रपती शिवाजी महाराज आग्राला बादशाहच्या भेटीस जाण्यास राजी झाले होते.
कोंढाणा किल्ल्यावर आता मुघलांच्या फौजा होत्या, मिर्जाराजे जयसिंग यांनी नेमलेला त्यांचा सुभेदार उदयभान होता. हा मूळचा राजपूत, त्याचं मूळ नाव उदयसिंह राठोड. मुघलांची चाकरी करत असताना त्याने आपला हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता.
या उदयभान्यान कोंढाणा किल्ल्यावर जणान खाना सुरू केला होता. जिजाऊ माँसाहेबांना ही गोष्ट खपत नव्हती. त्यावेळी जिजाऊ माँसाहेब राजगडावर होत्या. राजे स्वराज्याच्या पहाणीवर गेले होते. जिजाऊ माँसाहेबांनी महादेव नावाच्या रामोशी मावळ्याला बोलावले आणि त्याला सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांना ताबडतोब जिथे असाल तिथून राजगडावर येण्यास सांगावे.” असा संदेश द्या.त्यावेळी महाराज रायगडावर होते. महादेवाचा संदेश मिळताच राजे जिजाऊ माँसाहेबाकडे आले. त्यावेळी माँसाहेबांनी आपली खंत शिवाजी महाराजांसमोर व्यक्त केली आणि शिवाजी राजाला सांगितलं की
“आम्हाला कोंढाणा परत हवाय.“
परंतु शिवाजी महाराजांना आताच मुघलांशी वैर घ्यायचं नव्हतं. परंतु जिजाऊ माँसाहेबांनी जेंव्हा कोंढाण्याची खरी परिस्थिती शिवाजी राजांना सांगितली तेंव्हा राजांची तळपायाची आग मस्तकात गेली. राजांनी कोंढाणा परत घेण्यात येईल, असं वचन माँसाहेबांना दिलं.
त्यावेळी तानाजी मालुसरे त्यांच्या मुलाच्या म्हणजेच रायबाच्या लग्नाच आमंत्रण घेऊन शिवाजी राजाकडे आले होते. त्यांना राजे कोंढाण्यावर चढाई करणार आहेत, ही गोष्ट कळली. त्यावेळी तानाजींनी आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी बाजूला ठेवली आणि कोंढण्यावर चढाई करण्याची तयारी सुरु केली. शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाशी बोलून तानाजी मालूसरे यांना कोंढण्याच्या चढाईला पाठवण्याचे निश्चित केले. त्यापद्धतीने शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे व अन्य मावळे यांच्यात बैठक झाली आणि छत्रपती शिवाजी राजांचा हा शूर मावळा मोहिमेच्या तयारीत जुटला.
सविस्तर माहिती - छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह ; तानाजी मालुसरे - HeBaghBhau.Com
याचे उत्तर देण्यासाठी सिंहगडाची पार्श्वभूमी घ्यावी लागेल.
आपल्याला अशा कथा सांगितल्या जातात की जेव्हा तानाजी मालूसले यांनी कोंढाणा जिंकला आणि त्यांना वीरमरण आलं तेव्हा महाराजांनी 'गड आला पण सिंह गेला' म्हणून गडाचे नाव सिंहगड ठेवलं.
हे साफ खोटं आहे. तानाजींचं वीरमरण १६७० चं. कोंढण्याचा सिंहगड असा उल्लेख १६६३ च्या पत्रात येतो.
ते अस्सल पत्र इकडे देत आहे.
जिथे लाल आयत केला आहे तिकडे 'सिंहगड' असं आलं आहे. या पत्राचे भाषांतर खाली देतो.
“... साहेबी कोकणात नामदारखानावरी जाण्याचा तह केला होता. हाली किले सिंहगडावरून समाचार आला आहे की गडावरी काही फितवा जाला आहे. तुम्ही लष्करी लोकांनसी व खासखेली हशमांनिसी सिंहगडास जाणे. फितवा कोण कोण लोकी केला होता हे खबर लिहून हुजूर पाठवणे. तान्हाजी नाईक, कोंडाजी नाईक, कमळोजी नाईक व दरेकर, रुमाजी अहिरा व गोंदजी पांढरा हे बराबरी घेऊन सिंहगडास जाऊन बहुत खबरदार असणे...! ”
आता हे पत्र देण्याचं कारण काय तर इकडे तानाजींचा उल्लेख 'तान्हाजी' असा आला आहे.
परंतु सभासद,चिटणीस बखरीत 'तानाजी' असाच उल्लेख आलेला आहे. परंतु पत्र बखरीनपेक्षा जास्त विश्वसनीय असल्यामुळे 'तान्हाजी मालुसरे' हे असंच नाव होतं हे म्हणण्यास काही हरकत नाही.
धन्यवाद।
तानाजी मालुसरे हे कोणत्या प्रांताचे सुभेदार होते आणि त्या प्रांताची सुभेदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजींनाच का दिली होती?
सुभेदार तानाजी मालुसरे
छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी, प्रतापगडचे युद्ध, कोकणात सूर्व्यांशी केलेले युद्ध कुशल सेनानी, आणि कळसाध्याय म्हणून सिंहगड पुन्हा स्वराज्यात आणणारे विर मराठा योद्धा.
पण सर्व ठिकाणी त्यांना 'सुभेदार' म्हणले आहे.
आता सुभेदार म्हणले तर आपल्या मनात येईल की कोणत्या तरी प्रांताची म्हणजे सुभ्याची मुलकी जबादारी सांभाळणारे अधिकारी.
पण मराठा सैन्यात ही सुभेदार नावाचे एक पद होते.
२५ स्वारांवर एक हवालदार, ५ हवालदारांचा एक जुमलेदार आणि १० जुमलेदारांवर एक सुभेदार, म्हणजे साधारण १२५० स्वारांचा अधिकारी.
आजवर तानाजींना कोणत्याही प्रांताची मुलकी जबाबदारी दिल्याचे कोणत्याही ऐतिहासिक पुराव्यात माझ्या वाचनात आलेले नाही पण लष्करी जबाबदाऱ्या मात्र अनेक देण्यात आल्या होत्या.
माझा तर्क असा आहे की तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळात सुभेदार असावेत.
धन्यवाद. तुम्ही माझी मेहनत वाचवलीत. माझ्या अंदाजाने आजही भारतीय सैन्यात सुभेदार हा हुद्दा आहे. non commissioned officer.
आज कर्नलच्या हाताखाली एक बटालियन म्हणजे साधारण 800 सैनिक असतात. त्या हिशोबाने त्या वेळचा सुभेदार हा कर्नलच्या थोडा वरचा दिसतो.
तान्हाजी मालुसरे नेमके कुठले सुभेदार होते याबद्दल इतिहासात काही स्पष्ट माहिती मिळत नाही.
शाहिस्तेखान पुण्यात तळ ठोकून असताना शृंगारपूरकर सूर्यराव सुर्व्यांनी जेव्हा संगमेश्वर , दाभोळवर हल्ला केला तेव्हा तेथील कारभार तान्हाजी सुभेदार व सुभेदार त्र्यम्बक उर्फ पिलाजी निळकंठराव बघत होते व त्यांचीच सुर्व्यांशी चकमक होऊन तान्हाजींनी सुर्यरावास खरपूस समाचार घेऊन परतविले होते शिवभारतात म्हटले आहे.
आता त्र्यम्बक उर्फ पिलाजी निळकंठराव हे राजापूरच्या सुभेदारीवर होते म्हणजे तान्हाजी मालुसरे संगमेश्वर , दाभोळच्या सुभ्याचे सुभेदार असण्याची शक्यता असू शकते.
१] तानाजी मालुसरे चे गाव उमरठे नाही तर महाबळेश्वरचा गोडवली आहे . उमरठे गाव शेलार मामा (कोंढाजी रामजी शेलार )चे आहे . तानाजी चे वडील . काळोजी मालुसरे आणि त्याचे भाऊ भवरजी मालुसरे ह्यांची या भागात हुकूमत होती . पण आदिलशाही च्या कोण्या सरदार बरोबर झालेल्या झटापटीत दोघे मरण पावले . नंतर शेलार मामा तानाजी आणि सूर्याजी त्यांना उमरठे गाव महाड जवळ घेऊन गेले . त्याबरोबर त्यांची आई पार्वतीबाई पण उमराठे मध्ये आले . त्यामुळे तानाजी आणि सूर्याजी स्वराज्याला एकनिष्ठ झाले .
२)तानाजी मरण पावल्यावर पाच वर्षांनी बेळगाव जवळ पारगड चे किल्लेदार पद रायबा ला पण १६७५ ला दिले . तिथे त्यांचे घर आहे . ९साधारण त्यांचे वय १४ ते १६ असावे)
३) त्यानंतर वंशज वंशज शिवराज मालुसरे बेळगाव ला स्थायिक होते . नंतर त्यांच्या पत्नी डॉ. शीतल मालुसरे व त्यांचे पुत्र रायबा हे सध्या रायगड जिल्ह्यातील महाड येथे वास्तव्याला आहेत. डॉ. शीतल मालुसरे महाड येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर, मुलगा पुण्यात शिक्षण घेत आहे. .Video:नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज सध्या कोठे आहेत? | eSakal
४) तानाजी मरण झाल्यावर त्यांच्या पार्थिवावर जी कवड्याची माळ दिली ती माळ शिवराज मालुसरे कडे आहे , खरी खोट करण्यासाठी त्यांनी सातारच्या भोसले कडे पडताळणी केली . आणि तशीच माळ तभोसले च्या पूजेच्या मंदिरात असते . याला ऐतिहासिक पुरावा किंवा पात्र नाही
५) इतिहाससंशोधक दत्ताजी नलावडे यांनी खूप मेहनतीने तानाजी यांचे जन्मगाव शोधून काढले.सेतुमाधवराव पगडी आणि कमळ गोखले यानि यावर संशोधन केले पण बाकी अजून खूप बाकी आहे .
६) पाहण्यासाठी गोडवली या गावी येऊन तेथील परिसराची पहिला केली. त्यावेळी त्यांना येथे वीरगळी व राजमार्गाच्या खुणा आहेत.
७)तानाजी मालुसरे यांची तलवार बाळकृष्ण मालुसरे यांच्या संग्रही आहे असा त्यांचा दावा होता.
८)पारगडच्या भवानी देवीला शिवरायांनी अर्पण केलेले ९२ तोळे सोन्याचे दागिने व १२०० तोळे चांदीचे दागिने मालुसरे परिवाराने ट्रस्टच्या माध्यमातून जातं केले होते .
त्यांची कवड्याची माळ आणि तलवार
९)पारगडाविषयी काही अस्सल पत्रे बाळकृष्ण मालुसरे यांच्या कडे होते आणि त्याचे सेतू माधव पगडी यांनी कौतुक केलेले . . त्यातील पहिले पत्र आहे १९ नोव्हेंबर १७८८ चे. पारगड किल्ल्याच्या खर्चासाठी व्यवस्था तालुके डिचोली व पेडणे यांच्या उत्पन्नातून पुरातन आहे. त्याप्रमाणे आताही ते चालवावे म्हणून धोंडोकृष्ण नामजाद व कारकून किल्ले पारगड यांनी गोवर्णदोर जंजीरे गोवा यास पाठविले.सदर पत्रात कोल्हापूरमध्ये फौजे तयार होत आहे परंतू मसलत कोणीकडे आहे हे कळत नाही हे देखील वृत्त आहे. हे पत्र गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरला लिहिलेले आहे.फोंड सावंत तांबुळवाडीकर यांनी दादीबाई सावंत वाडीकर यांना सामील होऊन, बंड माजवून राजे खेम सावंत भोसले, सावंतवाडीकर यांच्या इलाख्यातील महादेवगड, मनोहरगडाच्या गडकऱ्यांनीही धामधूम माजविली. त्याचा उल्लेख दुसऱ्या एका पत्रात आहे. या बंडखोरांपैकी काहींनी सामानगड, पारगड, हेरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेतल्याचे उल्लेख आहेत.अशापैकी मनोहरगड परिसरात धामधूम माजविलेले काही फरारी पारगड परिसरात आले. त्याची माहिती पाठविल्याबद्दल डनलॉप साहेब-पोलिटिकल एजंट, कर्नाटक यांनी छत्रपती शहाजी उर्फ बुवासाहेब महाराज यांना १३ जानेवारी १८३७ रोजी पाठविलेले हे पत्र आहे. त्याशिवाय आणखी एक पत्र आहे आप्पाजी बिन येसाजी मालुसरा, किल्ले पारगड याला जनरल मन्रोसाहेब यांनी ८ ऑगस्ट १८१८ साली लिहिलेले. हे पत्र पारगड गडकरींच्या नावे आहे. त्यात गडकरी मजकूर पेशवे अंमलापासून जी मिळकत आजवर देत आले ती यापुढेही चालविण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. हे पत्र बाळकृष्ण मालुसरेंच्या संग्रही आहे.करवीर छश्रपती घराण्याच्या इतिहास साधने या ग्रंथाच्या चौथ्या खंडात लेखांक १९० चे पत्र आहे. त्यावर तारीख तिथी नाही. पारगडाचे हवालदार बाळसावंत यांनी हे पत्र पाठविले होते. शिवाजी महाराजांनी रायबा याला पारगडाची किल्लेदारी सोपविताना ‘चंद्रसूर्य असेतो गड जागवावा असा मजकूर असलेला एक ताम्रपट दिला होता. हा ताम्रपट आप्पाजी बिन येसाजी मालुसरा याच्याकडून ब्रिटिशांनी जप्त करून तो एनिकेशन ऑफिसमध्ये ठेवल्याचे काही कागदपत्रांवरून कळते व त्यानंतरच मुंबई सरकारने कागदी सनदा देऊन गडकऱ्यांना पगार सुरू केला.रायबा मालुसरे यांना मिळालेला हा ताम्रपट सध्या आहे कुठे याचा इतिहास संशोधकांनी शोध घ्यायला हवा. तसेच खळोबी बिन खंडोजी शेलार, किल्ले पारगड याला ८ ऑगस्ट १८१८ रोजी मिळालेली सनदही संशोधकांना अभ्यासासाठी उपलब्ध आहे. तानाजी मालुसरे यांच्या पत्नीचे नाव नीराबाई. तानाजी यांना उमा नावाची मुलगी होती. पोलादपूर तालुक्यातील उमरठ हे मालुसरे यांचे मूळ गाव आहे. उमरठमधील कळंबे घराण्यात उमाची सोयरीक जुळविण्यात आली. उमरठमध्ये आजही उमाचे वंशज नांदत आहेत. [1]
Edit 1
गोडवलीचा जायचा मार्ग(Prithvi raj Verman)
महाबळेश्वरला वाईवरून जाताना पसरणी घाट संपला की लगेच दांडेघर लागते, येथून फक्त २ ते ३ किमी अंतर आहे , दांडेघरपासून खिंड ओलांडली की लगेच गोडवलीची हद्द सुरु होते दुसरा रस्ता म्हणजे पाचगणीवरून वळसा मारून खिंगर रस्त्याने येणे (५ किमी वाढतात).
तळटीपा
Comments
Post a Comment